वडिलोपार्जित जमीन व संपत्ती नातेवाईकांच्या संमतीने कमीत कमी पैशात नावावर कशी होऊ शकते?
#वडिलोपार्जित #जमीन #वाटप
कोर्टात अथवा दुय्यम निबंधकांकडे जाण्याची गरज नाही.
वडीलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी अथवा 7/12 उतार्यावर वारसदारांची नावे लावण्यासाठी तुम्हाला कोर्टाची अथवा दुय्यम निबंधकांच्या कार्यालयाच्या पायर्या झिजविण्याची गरज नाही. सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास कोणतेही शुल्क न भरता जमिनीचे कायदेशीर वाटप करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे. याबाबतचा आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढला आहे.
कुटुंबातील जमिनीचे वाटप करण्यासाठी अथवा मयताच्या वारसदारांची नावे सातबारा उतार्यावर लावण्याची एक सोपी पद्धत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती असेल तर ते जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर करू शकतात. तहसीलदार त्या सर्वांना एक नोटीस काढून सर्वांची सहमती असल्याची खात्री करेल आणि जमीन वाटपाचा आदेश काढतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही तलाठ्यावर आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर नव्याने कोणत्याही नोटीसा काढण्याची गरज तलाठ्याला नाही. त्यामुळे अधिकाधिक नागरीकांनी जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून सात-बारा उतार्यावर नाव लावण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार तहसीलदारांकडे अर्ज करावेत, असे आवाहन दळवी यांनी केले आहे.
याबाबतचे परिपत्रक त्यांनी काढले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांवर सोपविली आहे. आजपर्यंत या तरतुदीकडे कोणी गांभीर्याने पहात नव्हते. त्यामुळे जमीन वाटपाचे असे अर्ज वर्षानुवर्षे तहसीलदार पातळीवर प्रलंबित रहात होते. तसेच या ‘प्रक्रीये’ला वैतागलेल्या नागरिकांकडून दिवाणी न्यायालयात किंवा दुय्यम निबंधकांकडे धाव घ्यावी लागत होते. तेथेही पैसा आणि वेळ खर्च करावा लागत होता. तरी तेथेही असे दावे तातडीने निकाली काढले जात नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे कलम जमीन महसूल कायद्यातील कलम 85 ची कठोर अंमलबजावणी करण्याचा आदेश दळवी यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांची कार्यशाळा घेऊन अधिकाधिक जनतेपर्यंत ही तरतूद पोचविण्याचेही या आदेशात नमूद केले आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा आणि दरमहा त्याचा आढावा घेण्याचेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
#MahitiAsayaylachHavi
#माहितीअसायलाचहवी
आपल्या Facebook गृपला जोडण्याकरीता लिंक- माहिती असायलाच हवी
आमचे YouTube वरील माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी-
माहिती असायलाच हवी whatsapp group ला अॅड होण्यासाठी खालील माहितीपर Google form भरावा ही नम्र विनंती.
तुम्ही तुमच्या प्रश्नात एक महत्वाची बाब मांडली आहे की "नातेवाईकांच्या संमतीने नावावर". याचा अर्थ तुम्हास ती मालमत्ता नातेवाईकांच्या संमतीने तुमच्या नावावर करायची आहे असे दिसते. मात्र या प्रश्नाचे आगोदरच्या उत्तरात लिहिल्याप्रमाणे ती मालमत्ता तुमच्या नावावर होणार नाही. त्या उत्तरानुसर तुम्ही धरून सगळे नातेवाईक रेकोर्डवर येतील. त्यानंतर तुम्हास त्या नातेवाईकांकडून विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून नोंदवून घ्यावे लागेल. ते हक्कसोडपत्र ग्रामसेवक तलाठी कार्यालयात सादर करून मगच तुमचे एकट्याचे नाव रेकोर्डवर येईल. आणखी एक सूचना अशी की यासाठी योग्य वकील नेमून, त्याची फी देऊन हे काम करून घेणे.
Comments
Post a Comment